9
जीवनातील विसंगती
मी या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला. नीतिमान आणि ज्ञानी माणसे व त्यांचे कार्ये समजण्याचा स्पष्टपणे प्रयत्न केला. ते सर्व देवाच्या हातात असते. कोणीतरी आपला तिरस्कार किंवा प्रेम करील याबद्दल काहीही माहीत नसते.
जे काही घडते ते सर्वांस सारखेच घडते.
नीतिमान आणि दुष्ट,
चांगला आणि वाईट,
शुद्ध आणि अशुद्ध,
यज्ञ करणारा आणि यज्ञ न करणारा, या सर्वांची सारखीच गती होते.
चांगला मनुष्य पापी मनुष्यासारखाच मरेल.
शपथ वाहणाऱ्याची, तशीच शपथ वाहण्यास घाबरतो त्याची दशा सारखीच होते.
जे काही सूर्याच्या खालती करण्यात येत आहे त्यामध्ये एक अनिष्ट आहे. सर्वांचा शेवट सारखाच होतो. मानवजातीच्या मनात सर्व दुष्टता भरलेली असते. ते जिवंत असतात तोपर्यंत त्यांच्या मनात वेडेपण असते. मग त्यानंतर ते मेलेल्यास जाऊन मिळतात.
जो मनुष्य अजून जिवंत आहे त्याच्याबाबतीत आशेला जागा आहे. पण हे म्हणणे खरे आहे. जिवंत कुत्रा मरण पावलेल्या सिंहापेक्षा चांगला असतो.
जिवंताना ते मरणार आहेत हे माहीत असते.
पण मरण पावलेल्यांना काहीच माहीत नसते.
मरण पावलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही.
कारण त्यांचे स्मरण विसरले आहे.
त्यांची प्रीती, द्वेष व मत्सर ही कधीच नष्ट होऊन गेली आहेत,
आणि जे काही सूर्याच्या खालती करण्यात येत आहे,
त्यामध्ये त्यांना पुन्हा कधीही जागा नाही.
तुझ्या मार्गाने जा, आनंदाने आपली भाकर खा आणि आनंदीत मनाने आपला द्राक्षरस पी, कारण देवाने तुझी चांगली कृत्ये साजरी करण्यास मान्यता दिली आहे. सर्वदा तुझी वस्त्रे शुभ्र असावी आणि तुझ्या डोक्यास तेलाचा अभिषेक असावा.
तुझ्या व्यर्थतेच्या आयुष्याचे जे दिवस त्याने तुला सूर्याच्या खालती दिले आहेत त्यामध्ये, तुझ्या व्यर्थतेच्या सर्वच दिवसात, तुझी पत्नी जी तुला प्रिय आहे तिच्याबरोबर तू आनंदाने आपले आयुष्य घालीव, कारण आयुष्यात, आणि तू ज्या आपल्या उद्योगात सूर्याच्या खालती श्रम करतोस तेथेही तुझा वाटा हाच आहे. 10 जे काही काम तुझ्या हाती पडेल ते सर्व तू आपल्या सामर्थ्याने कर. कारण ज्या कबरेत आपण सर्व जाणार आहोत त्यामध्ये काम, विचार, ज्ञान आणि शहाणपणही नसते.
11 मी सूर्याच्या खालती काही कुतुहलाच्या गोष्टी पाहिल्या.
वेगाने धावणारा शर्यत जिंकत नाही,
सर्वशक्तिमान लढाई जिंकतो असे नाही.
शहाण्याला अन्न खाता येते असे नाही.
समंजसास संपत्ती मिळते असे नाही,
आणि ज्ञान्यावरच अनुग्रह होतो असे नाही.
त्याऐवजी समय व संधी त्या सर्वावर परीणाम होतात.
12 कोणालाही त्याचा मृत्यू समय माहीत नाही,
जसा मासा मरणाच्या जाळ्यात सापडतो,
किंवा सापळ्यात अडकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे,
त्याचप्रमाणे जनावरे, मानवजात अरिष्टाच्या समयी, तो त्यांच्यावर
अचानक येऊन पडला म्हणजे सापळ्यात अडकतो.
सामर्थ्यापेक्षा ज्ञान थोर
13 हे ज्ञानही मी भूतलावर पाहिले आहे आणि हे मला फार महत्वाचे वाटते. 14 थोडे लोक असलेले एक लहान शहर होते. एक महान राजा त्या शहराविरुध्द लढला आणि त्याने त्याचे सैन्य त्या शहराभोवती ठेवले. 15 पण त्या शहरात एक विद्वान होता. तो विद्वान गरीब होता. पण त्याने आपल्या ज्ञानाने त्या शहराचा बचाव केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब मनुष्यास विसरून गेले.
16 मग मी निर्णय केला, बळापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे पण गरीबाच्या ज्ञानाला तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाही.
17 विद्वान मनुष्याने शांतपणे उच्चारलेले काही शब्द
हे मूर्ख राजाने ओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा चांगले असतात.
18 शहाणपण हे युध्दातल्या तलवारी आणि भाले यापेक्षा चांगले असते.
पण एक मूर्ख अनेक चांगल्यांचा नाश करतो.